नितीन गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले. ...
भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे. ...
उत्तर नागपुरात नितीन राऊत यांची मुत्सद्देगिरी कामी आली, तर पश्चिम नागपुरात विकास ठाकरे यांच्या संघर्षाला फळ मिळाले. या दोन्ही नेत्यांनी दमदार एन्ट्री करीत ‘काँग्रेस अभी जिंदा है’ हे सिद्ध केले. त्यांच्या विजयाने काँग्रेसची शान राखली गेली. ...
उपराजधानीतील निवडणुकीबाबत यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारीदेखील ३.८० टक्क्यांनी खालावली. परंतु ‘नोटा’ची संख्या मात्र वाढल्याचे दिसून आले. ...