धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
विश्वासाने जनतेने भाजपला निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहेच. शिवाय शेतकरी राजालाही उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वर्ध्यातील सेलसुरा येथील सभेदरम्यान केला. ...
हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्ही आरोपी फाशीवर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल आणि हा निकाल उच्च न्यायालयात कायम राहील ही जबाबदारी राज्य शासनाची आहे ...
शेतकरी आणि सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भ्रमनिरास करणाºया भाजप सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर ...
डोंबिवली : एमआयडीतील निवासी भागातील उष्मा पेट्रोलपंपानजीकचा भूखंडा हा निसर्ग उद्यानासाठी आरक्षित असताना तो मार्बल कंपनीला कमी दराने देण्यात आला आहे. ...
राज्य सरकारच्या ऊर्जा विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली कृषी संजीवनी योजना ही शेतक-यांसाठी संजीवनी देणारी योजना नसून त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणारी योजना आहे. ...
राज्य सरकारच्या ऊर्जा विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी योजना नव्हे तर त्यांच्याकडून वसुली करणारी योजना असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...
बीटी बियाणाला बोंड अळी दाद देत नाही. त्यामुळे त्यातून शेतक-यांचे नुकसान होत असल्याचा स्पष्ट अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर २०१५ मध्ये शासनाला दिला होता. ...
राज्याचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी काल आष्टी येथील आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सुरेश धस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत 15 कोटी घेऊन भाजपाला मदत केल्याचा आरोप भर सभेत केला होता. त्या केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी माजी राज ...