देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली. ...
भाजप सरकारमध्ये सुरू असलला भोंगळ कारभार लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानात उतरण्याची गरज आहे. हेवेदावे न करता पक्षसंघटनेस मजबूत करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. ...
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या घराबाहेर एकत्र येत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
महापालिका निवडणुकीसाठी रविवारी धुळे व अहमदनगरमध्ये मतदान होत असून, धुळ्यात पैशांचा खेळ सुरू आहे. पैसेवाटप करीत असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे दोन जणांवर चाकूहल्ला झाला. ...
गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केले ...