देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारले आहे ...
अमेठीतून राहुल यांच्यासमोर भाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचे आव्हान असणार आहे. राहुल यांनी वायनाडमधून निवडणूक लढवावी यासाठी एक महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. ...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी घेणार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास देवरा व कामत गटाचा कडाडून विरोध आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या उमेदवारीवर चर्चा सुरू होत्या. तसेच शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची देखील चर्चा होती. परंतु औरंगाबादमधून काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन यांच्या उमेदवारीच्या चर्चा ...