देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मागील निवडणुकीत 80 खासदारांपैकी 70 हून अधिक भाजपाचे खासदार उत्तर प्रदेशातून निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सपा-बसपा, काँग्रेस आणि भाजपा प्रयत्न करत आहेत. ...
काँग्रेसने देशातील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदीया यांचा समावेश आहे. ...