देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ...
काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली. ...
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांच्या उमेदवारीस काँग्रेसच्या ४७ पैकी ४२ नगरसेवकांनी विरोध करून त्यांच्याऐवजी शिवसेनेत असलेले सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने तिकीट द्यावे, अशी मागणी केली आहे. ...