देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सकाळी एका इच्छुकाला उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा असताना पुन्हा बैठक सुरु झाल्याने उमेदवार निवड पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. ...
काँग्रेसकडून गरिबांसाठी आणलेली न्याय ही योजना मोदी सरकराने बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम करेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला ...
इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधले विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे. ...
काही कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांची लाडूने तुला करण्याचे ठरवले होते. त्यासाठी प्रियंका यांचे वजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाडू आणले गेले होते. लाडूतुला झाल्यानंतर हे लाडू गरिबांमध्ये वाटप करण्यात येणार होते. ...