देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी जालन्यातील गुरू गणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. ...
राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून २ हजार २८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
भाजपाला रोखण्यासाठी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. आता आम आदमी पक्ष दिल्ली आणि हरियाणामधील सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ...