देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती. ...
जालना लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली नूतन वसाहत, विद्युत कॉलनी, कांचननगर, समर्थनगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती. ...
नांदेड लोकसभेसाठी गुरुवारी मतदान पार पडले़ उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता होती़ परंतु गुरुवारी तापमान कमी असल्यामुळे पाच टक्क्यांनी मतदान वाढून ६५़१५ वर गेले़ त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत़ ...