देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गुन्हे दाखल असलेल्या 170 उमेदवारांपैकी 127 उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील 12 उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे. ...
भाजपच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेवर यावेळी केजरीवाल यांनी आपले मत मांडले. केजरीवालांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा काढला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला नसेल तर मोदींचे पुनरागमन अशक्य असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. ...
गोव्यात आमदार सतत पक्षांतरे करतात, त्यामुळे स्थैर्य हे एक आव्हान बनते, असे विधान केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपच्या प्रचार सभेत केले. ...