देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस नगरसेविका जान्हवी पोटे यांना उपमहापौरपद मिळावे, यासाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी षड्यंत्र केले आहे. तसेच माझी गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे ...
शिवसेना आणि मनसे भगव्यासाठी लढत असताना भाजप देखील हिंदु मतांसाठी प्रयत्नशील आहे. मात्र भाजपचे धोरण सबका साथ सबका विकास असल्यामुळे भाजपला हिंदू मतांसह इतर मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे. ...
राज्यात ती पक्षांचे सरकार असल्याने काही मुद्द्यांवर मतभेद होतील. मात्र आपण विचारधारेशी तडजोड न करता सामोचाराने सरकार चालवावे. कोणीही वादग्रस्त विधाने करू नयेत ...