देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील दिवंगत माधवराव सिंधिया यांनी उगवता सूर्य या चिन्हावर ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती त्याच पक्षाला पुनर्जिवीत कऱण्याचा सल्ला समर्थकाकडून देण्यात आला आहे. ...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसही भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे. पुण्यात महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ...
ज्या पद्धतीने भाजपचे लोकसभेचे यश बघून विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले आहेत ते बघता आता त्यांना पुनर्प्रवेश मिळणार का हाच सवाल उपस्थित होतो आहे. अशावेळी थोरात यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. ...