1999 मध्ये सौरभ कालिया यांच्यासह सहा जवान सापडले होते पाकिस्तानच्या कैदेत, अमानूष छळ करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 05:36 PM2019-03-01T17:36:55+5:302019-03-01T17:49:23+5:30

विमान कोसळून तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने आज सुटका केली आहे. मात्र 20 वर्षांपूर्वी 1999 मध्ये कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासह 6 जवानांची ताब्यात घेऊन निर्घृण हत्या केली होती.

सौरभ कालिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पाकिस्तानने परत केल्यावर त्यांच्यावर किती अत्याचार झाले होते, हे समोर आले.

मे 1999 मध्ये सौरभ कालिया यांना पाकिस्तानी घुसखोरीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी पाकिस्तानने त्यांना पकडले होते.

सौरभ कालिया यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक यातना देण्यात आल्या होत्या. मोठ्या प्रमाणात झालेल्या मारहाणीमुळे त्यांच्या शरीरातील बहुतांश हाडे तुटली होती.

सौरभ कालिया यांच्यासोबत नरेश सिंह, भीखा राम, बनवारी लाल, मूला राम आणि अर्जुन राम हे जवान होते.

बटालिक परिसरात गस्तीवर असतावा सौरभ कालिया आणि त्यांच्या साथीदारांना पाकिस्तानने कैद केले होते.