राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
अजित पवार गटाने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांना वेटिंगवर ठेवले असून, निफाडच्या जागेसाठी भाजपचे यतीन कदम आग्रही असल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. ...
Maharashtra Assembly election Mahayuti Seat Sharing: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मकरंद पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. ...
मविआतील तिन्ही प्रमुख पक्षांनी ८५-८५-८५ अशा नव्या फॉर्म्युल्यावर एकमत केलं असून उर्वरित ३३ जागांवर उद्या अन्य मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...