स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूर जिल्ह्यातून ४८,००० ग्रामस्थांनी मत नोंदविले होते. परंतु यावर्षी नागपूर जिल्हा राज्यात चांगलाच पिछाडीवर आहे. नागपूर जिल्ह्यातून आतापर्यंत फक्त २७०७ ग्रामस्थांनी स्वच्छ सर्वेक्षणात आपली मते नोंदविली आहेत. ...
रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. ...
श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट अंतर्गत कार्यरत श्री ज्ञानोदय सेवा संघाद्वारे अखिल भारतीय हास्य कविसंमेलनाचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. ...
नागपूरसह ठाणे व पुणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ स्थापन करून मानसिक आरोग्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे अमरावती येथील बहुचर्चित महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते. अमरावती सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आणि नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर व एम. आर. डागा यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली होती. ...
सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे विसर्जनाच्या वेळी निर्माल्यही तलावात टाकण्याऐवजी ते कलशामध्ये रीतसर गोळा केले जात असून यामुळे महापालिकेच्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. ...