देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राफेल या घोटाळ्याची चौकशी झाल्यास भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नार्को टेस्टही करावी लागेल, असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी ठाण्यात व्यक्त केले. ...
राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली. ...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या महिन्यात गोवा भेटीवर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रव्यापी जनसंपर्क अभियान समाप्त झाल्यावर 20 जानेवारीनंतर तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात ते कधीही गोव्यात येण्याची शक्यता आहे. ...