देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुलगा डॉ. सुजय यांनी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचा झेंडा हातात घेतल्याने प्रचंड चर्चेत आलेले विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे बुधवारी दुपारी कोल्हापुरात अचानक येऊन गेले. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षात आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच नेते व्यस्त आहे. निवडणुकीच्या रणांगणात बाजी कोण मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत ...