देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गुणा येथील बसप उमेदवार लोकेंद्रसिंह राजपूत यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच येथील काँग्रेसचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठिंबाही जाहीर केला. त्यामुळे बसपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. ...
सट्टाबाजारात युतीच फेव्हरेट आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जवळपास तिपटीने जास्त जागा मिळण्याची शक्यता असली, तरी सर्वाधिक जागेवर युतीचे उमेदवार विजयी होतील ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला करताना मंगळवारी शास्त्री भवनमध्ये लागलेली आग ही मोदींच्या सांगण्यावरून लावण्यात आली होती असा आरोप केला आहे. ...