देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सिमेंट रोडच्या उंचीमुळे दुकानांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचण्याची शक्यता विचारात घेता पुढील काम करताना आधी एक फूट रस्ता खोदा व नंतर त्यावर सिमेंट रोडचे बांधकाम करा, अशी सूचना आ.विकास ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
काँग्रेससह शिवसेनेला सोबत घेत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तर दुसरीकडे मात्र नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत काँग्रेस विरोधातच दंड थोपटले आहेत ...
दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांवर बैठक होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील उद्या (22 नोव्हेंबर) मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे. ...