देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
फोडाफोडी करणार नाही, असे सांगत कॉँग्रेसच्या नावाने खडे फोडणाऱ्या आणि आपले राजकारण शुचिर्भूत असल्याचा दावा करणाºया भाजपचे हे कसले राजकारण म्हणायचे? महाराष्ट्र अस्मानी-सुलतानी संकटात असताना सत्तेसाठीचा हा खेळ चीड आणणारा आहे. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून (१८ नोव्हेंबर) सभागृहात सतत गैरहजर असल्यामुळे प्रत्येक जण संभ्रमात पडला आहे. गांधी बहुधा उद्याही लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही. ...