देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होण्यापूर्वी पक्षाला गट नेत्यांची निवड करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड बुधवारी होणार आहे. ...
‘आज के शिवाजी नरेंद्र मोंदी’ या पुस्तकावर बंदी टाकून लेखक जयभगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फ शहरातील सहाही विधानसभानिहाय ब्लॉक अध्यक्षांच्या चौकाचौकात धरणे व निदर्शने करुन निषेध करण्यात आला. ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
टिळक भवन येथे आज बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची, महिला काँग्रेस, एनएसयुआय, तसेच सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ...