देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचे नियोजन शिस्तबद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी देखील दिल्लीत भाजपचा प्रचार केला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ...
दिल्लीकरांनी विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षालाच विजयी केले. दुहेरी आकडा न गाठता येणाऱ्या भाजपला आठ ठिकाणी विजय मिळाला. 2015 मध्ये भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यामध्ये पाच जागांची भर पडली आहे. ...