देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेशातील काँग्रेस आणि कमलनाथ यांचे सरकार कायम राहणार आहे. येत्या 16 मार्च रोजी तुम्हाला हे दिसून येईल. काँग्रेसच्या आमदारांची संख्या तुम्हाला पूर्वीऐवढीच दिसून येईल, असा दावा आमदार अर्जुन सिंग यांनी केला आहे. ...
मध्य प्रदेशात १५ वर्षांनंतर काँग्रेसने सत्ता मिळविली होती. देशभर मोदी-शहांचा अंमल असताना, काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही फारसे प्रभावी नसताना मिळालेली ही सत्ता पक्षांतर्गत रोष आणि कुरघोडीमुळे गमावण्याची वेळ काँग्रेसवर आली. अन्य राज्यांत आता काँग्रेसला ...
MP Political Crisis: ‘पक्षात राहून जनतेची सेवा करणे अशक्य होत असल्यानेच पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे,’ असे शिंदे यांनी ९ मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. ...
काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील मातब्बर नेते असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशच्या आणि देशाच्या राजकारणातील एक अग्रगण्य घराणे असलेले शिंदे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...