देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवक काँग्रेस वतीने येथे न्याय योजना राबविण्यात आली. ‘युवक काँग्रेस देगी एक दिन का न्याय, केंद्र सरकार दे अगले ६ माह का न्याय’ असे आश्वासन काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीर नाम्यात दिले ...
राज्यातील आरोग्ययंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही ...
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ...
आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी भाजपाला दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते ...
दिवस कसे पालटतात बघा. त्यावेळी ‘मनरेगा’ची जी खिल्ली उडविली, त्याच ‘मनरेगा’पुढे साष्टांग दंडवत घालायची वेळ मोदींवर आली आहे. गेल्या पाच दशकांत झाले नव्हते, इतके लोक गेल्या दोन महिन्यांत बेरोजगार झाले आहेत. ...
कोरोना टेस्टिंग किटच्या आयातीतही झटका बसला. लॉकडाउनच्या काळात गरिबांना आर्थिक मदत करायला हवी, सर्वांना मोफत धान्य, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेस आणि ट्रेनची व्यवस्था करायला हवी, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. ...
कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ भाजपाने शुक्रवारी राज्यभरात 'मेरा आंगण, मेरा रणांगण' : महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन केले. ...