देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर धरणे व निदर्शने करण्यात आली. पूर्व नागपुरात वर्धमान नगर येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली. ...
राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने त्यांना ताब्यात घेतले आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करत असल्याच्या आरोपाखाली ब्यावरच्या दोन भाजप नेत्यांचे नाव समोर आले आहे. ...