देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Prashant Kishor meets Priyanka Gandhi: बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी अचानक काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. ...
"गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा न मिळाल्याने आता 'एसआयआर'च्या (SIR) नावाखाली दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरिबांची नावे मतदार यादीतून वगळली जात आहे." ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता त्या तरुणांना रस्त्य ...
Dr. Anjali Nimbalkar: गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या इंडिगोच्या विमानामधून प्रवास करत असलेल्या एका अमेरिकन महिलेचे काँग्रेसच्या महिला नेत्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचल्याची थरारक घटना समोर आली आहे. ...
Prithviraj Chavan's Prediction: येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल अन मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी क ...