जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकतेच जाहीर केले आहे. त्यासाठी ईपीएफओने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, आधार कार्डला जन्मतारखेच्या पुराव्याच्या सूचीतून हटविण्यात आले आहे. ...
३१ मार्च रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षातील ४५ लाख कोटी रुपयांच्या एकूण अर्थसंकल्पाचा अन्न आणि खते अनुदान हा नववा हिस्सा आहे. केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षासाठी अन्न आणि खतांच्या अनुदानासाठी ४ लाख कोटी रुपये वाटप करू शकते. ...
नोकरी, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कृषि अभ्यास दौरा, शेतकरी अभ्यास सहल व पर्यटनाला परदेशात जाणाऱ्या सातारकरांची संख्या अलिकडे वाढू लागली आहे. परदेशगमनाचे हे स्वप्न पासपोर्ट शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनं ...
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्या ...
राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एन.सी.डी.सी.) यांच्याकडून राज्यातील साखर कारखाने साखर माल तारण कर्ज उपलब्ध करून घेतात. प्रतिक्विंटल ३,१०० रुपये इतका असून, त्यामधून पंधरा टक्के मार्जिन मनी रक्कम वजा करून फक्त २,६३५ रुपये प्रतिक्विंटल इतके कारखान्यांना कर ...
१५ जानेवारी २०२४ पर्यंत देशातील ५०९ साखर कारखान्यात १५६३ लाख टन उसाचे गळीत झाले असून त्यातून १४८.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.उसाचे गळीत आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने आज पर्यंत आघाडी राखली आहे. ...
देशात यंदा ऊस आणि साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने त्याचा फटका इथेनॉल उत्पादनालाही बसणार आहे. याची तीव्रता कमी व्हावी, इथेनॉलसाठी कच्चा माल पुरेसा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने मोलॅसिसच्या निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लागू करणार. ...