PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले.
सद्यस्थितीत महामारीमुळे सर्वत्र नकारात्मकता पसरली आहे. वाढते आजारपण आणि आप्तजनांच्या मृत्यूच्या बातम्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. महामारी आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांना आध्यात्माची जोड देऊन आपण खारीचा वाटा उचलुया. मंत्रोच्चाराने आजारातून बरे होण्याची सकारात्मकता निर्माण होते. मानसिक आरोग्य सुधारते. मृत्यूची भीती कमी होते. अशा वेळी मन शांत करून भगवंताची उपासना करण्याबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. हा मंत्र केवळ स्वतःसाठीच नाही, तर आप्तजनांसाठी, मित्रपरिवारातील आजारी व्यक्तीसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी प्रार्थनारूपी करता येतो.