नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...
पश्चिम घाटातील महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा सातत्याने होणाऱ्या 'वर्षा'वाने न्हाऊन निघाल्या आहेत. जुलै महिन्यात सलग तीन आठवडे पडणाऱ्या पावसाने आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा अधिक पटीने पावसाची नोंद झाली आहे. ...
धरणाचे चार दरवाजे खुले असून, शुक्रवारी पहाटे ५ वाजता एक क्रमांकाचे गेट उघडले होते, दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने क्रमांक एकचा दरवाजा दुपारी १ वाजता बंद झाला. ...
पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मागील ३६ तासांत तब्बल २५ टक्के पाणी उजनीत आल्याने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता माइनसमधील हे धरण प्लसमध्ये आले आहे. ...