२०२३ मधील खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविणाऱ्या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार २०३ शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या ३ लाख ६४ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या (८३.२४ टक्के) बँक खात्यात तीन टप्प्यांत एकूण ३७० कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिरीचे अनुदान ४ लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आले आहे. महागाईच्या काळात शेतकऱ्यांना विहीर खोदकाम आणि बांधकाम करताना दिलासा मिळणार आहे. ...
ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ग्रामविकास विभागासोबतचा करार संपुष्टात आल्याने ग्रामपंचायतींची ऑनलाइन सेवा १ ऑगस्टपासून ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधून विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळण्यास ग्रामस्थांना अडचण निर्माण झाली आहे. ...
सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३- २०२४ गाळप हंगामातील उसाला ३ हजार ५७१ रुपये उच्चांकी ऊस दर जाहीर केला आहे. ...