देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रश्न विचारला आणि मोबाइलमध्ये चित्रिकरण केल्याच्या कारणावरून त्यांना थेट अटक करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल डीलच्या फाईल्स असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी करणारे पत्र शनिवारी काँग्रेस पार्टीनं राष्ट्रपतींना लिहिले आहे. ...