देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या भाजपची तीन मते काँग्रेसला मिळाली आहे. या विभागात आपचे आठ नगरसेवक होते. तरी देखील 'आप'ला अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देखील मिळवता आले नाही. ...
भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. यापूर्वी माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी गुरुवारी केला. ...
काही ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गटाराचे किंवा नाल्याचे झाकण उघडे राहिल्याने नागरिकांना आपला जीव गमावल्याच्या घटना सुद्धा यापूर्वी घडलेल्या आहेत. याला कारण एकच, अर्धवट नालेसफाई! ...