देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Ministry List of Maharashtra 2020 : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या एकूण 36 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. ...
थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडल्यावर आता थोपटे यांच्या फलकावरील चेहऱ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने काळे फासले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. ...
मदार संग्राम थोपटे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडले आहे. मात्र थोपटे यांनी 'ते माझे कार्यकर्ते नाहीत, हे माझ्याविरोधील षड्यंत्र' असल्याचा नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण ...