देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आज केंद्रातील मोदी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. यावर, सरकारचा हा निर्णय योग्य असून सरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...
कोरोनाविरोधात लढाईत सहभागी असलेले शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, फार्मासिस्ट यांच्या कामांचा काँग्रेसने गौरव केला आहे. या सर्वांनीही आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसू ...
मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता टिकवण्यात अपयशी ठरली आणि भाजपाने बाजी मारली होती. याच सत्ता स्थापनेच्या वेळी कमलनाथ अनेकवेळा पत्रकारांशी संवाद साधत होते. ...
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून निर्देश दिले आहेत, की कोरोना बाधिताची माहिती मिळताच संबंधित विभागाला सूचित करावे. ...