देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
HD Kumaraswamy And Congress : काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे. ...
NCP Jayant Patil Letter To Dr Babasaheb Ambedkar : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना पत्र लिहून अभिवादन केले आहे. ...
गेहलोत म्हणाले, काँग्रेस नेते अजय माकन, हे यापूर्वी भाजपकडून झालेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांचे साक्षिदार राहिले आहेत. या घटनेदरम्यान माकन 34 दिवस हॉटेलमध्ये आपल्या आमदारांसोबत राहिले होते. ...
मला खात्री आहे, की तिला शेतकरी आणि हिमाचलमधील लोक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याबद्दल धडा शिकवतील. तसेच हिमाचलमध्ये घुसण्यापासून बंदी घालतील. यानंतर लपण्यासाठी एकच घर असेल, ते म्हणजे नरेंद्र मोदींचे, असेही बिट्टू यांनी म्हटले आहे. ...