देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
"आरएसएस आणि भाजप देशद्रोही आहेत. जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल, तर संविधानाचे रक्षण करा," असेही खर्गे यांनी म्हटले आहे. ते महू येथे बोलत होते... ...
सत्ताधारी भाजपचे जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते. यांतील बरेच बदल विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सुचवले होते. मात्र, विरोधकांनी सुचवलेले बदल मतदानाद्वारे फेटाळण्यात आले आहेत... ...
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे. ...