देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, त्या आघाडीतील इतर सहकाऱ्यांच्या समर्थनामुळे जिंकल्या आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. ...
आठवले म्हणाले, ‘‘राहुल गांधी म्हणतात की, आम्ही सत्तेत आलो तर, असे करू. आपण सत्तेत येण्याचा प्रश्नच नाही. आपल्यासाठी पुढील 25 वर्षे सत्तेत येणे फार अवघड आहे. जोवर मोदीजी आणि मी सोबत आहोत, हे असंभव आहे.’’ ...
Political Parties Donations : मागच्या काही वर्षांत विविध माध्यमातून मिळणाऱ्या देगण्यांमध्ये भाजपाने आपला दबदबा राखला आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका आकडेवारीमधून काँग्रेसनेही देणग्या मिळवण्याच्याबाबतीत मोठी मुसंडी मारल्याचं दिसत आहे. ...