श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नगराध्यक्षपदाच्या निवडीसह भाजपला सहा नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आणण्यात यश आले आहे. माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजप वगळता दाखल झालेले सर्व अर्ज मागे घेण्यात आले. ...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुतीतच कुस्ती सुरू झाली आहे. कुरघोड्या करत एकमेकांना धक्के देण्याचे प्रयत्न सुरू असून, छगन भुजबळांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. ...
विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच नव्हे, तर आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनाही पक्षात घेऊन महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवण्याचे भाजपा धोरण निवडणुकांपूर्वी सत्ताधारी महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण करत आहे. ...
मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. त्यात भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि रामदास आठवलेंच्या आरपीआयसोबत मित्रपक्ष एकत्रित राहू असं आशिष शेलारांनी सांगितले. ...