मागील वर्षी झालेल्या पावसामुळे बेदाण्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली होती. मार्च व एप्रिलमध्ये दर नव्हता. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल, म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवला. ...
हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट ९ सप्टेंबरपासून दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. या दिवसांत शेतकऱ्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. ...
गणेशोत्सवामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, नारळ, साखरेसह उत्सवासाठी आवश्यक पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे. पाच दिवसांत तब्बल ४,६३३ टन नारळांची विक्री झाली आहे. ...
वसई तालुक्यात भात पिकाची लागवड होते. भात पिकाचा पेरा अधिक असला तरी काही शेतकरी जुन्या भाताची विक्री नवीन भात पीक निघण्यापूर्वी करतात. दर वाढेल, हा यामागील हेतू असतो; परंतु सध्या भाताचे दर घसरलेलेच आहेत. ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात बुधवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ४ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला तसेच सरासरी ४ हजार ते ४ हजार २०० रुपये दर मिळाला. ...