एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. डी. धानुका व न्या. व्ही. जी. भिश्त यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने एअर इंडियाला दोन आठवड्यांत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...
या वेळच्या बोलीची अंतिम मुदत ३१ आॅगस्टला संपणार आहे. आतापर्यंत फक्त टाटा समूहानेच एअर इंडिया खरेदीसाठी अधिकृत बोली लावली आहे. इतर कोणतीही कंपनी खरेदीसाठी पुढे आलेली नाही. ...
सरकारी मालकीची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियावर ६० हजार ७४ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने या कंपनीची विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...
एअर इंडियाचे नागपूर-दिल्ली विमान सोमवारी सकाळी हैदराबादमार्गे रवाना झाले. एआय ५६० हे विमान नागपूरवरून सकाळी ९.३० वाजता रवाना झाले. ते दिल्लीवरून सकाळी ७ वाजता नागपूरला पोहोचले होते. ...
कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल. ...
भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या एअर इंडिया च्या कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा संबोधून त्यांना कोरोना विमा योजनेमध्ये अंतर्भूत करावे. ...