पंतप्रधान जवाब दो, पंतप्रधान परत जा, मणिपूरला जा, अशा घोषणा मणिपूरी नागरिकांनी महात्मा फुले मंडईसमोर दिल्या. प्रत्येकाने हातामध्ये फलक घेतले होते. त्यात लहान मुलेही सहभागी झाले होते. तसेच शहराच्या इतर ठिकाणीही काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे आक्रमक झाले आहेत.