उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:04 IST2026-05-08T12:52:42+5:302026-05-08T13:04:55+5:30

ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना अचानक लाइट गेल्याने मोठी तारांबळ होते. पण, उन्हाळ्यातच लोडशेडिंग का होतं? याचं कारण माहितीये का?

उन्हाळा आला की सतत लाइट जाण्याचं प्रमाण वाढतं. अगदी भर दुपारी आणि कधीकधी मध्यरात्रीही अचानक लाइट जाते.

ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना अचानक लाइट गेल्याने मोठी तारांबळ होते. पण, उन्हाळ्यातच लोडशेडिंग का होतं? याचं कारण माहितीये का?

उन्हाळा आला की अनेक भागांमध्ये लोडशेडिंगची समस्या वाढते. तापमान वाढल्यामुळे विजेची मागणी अचानक खूप वाढते आणि त्यामुळे वीज पुरवठ्यावर ताण येतो.

उन्हाळ्यात एसी, कूलर, फॅन, फ्रिज यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. वीजेचा वापर अचानक वाढल्याने अनेकदा मागणीपेक्षा पुरवठा कमी पडतो.

जास्त वीज वापरामुळे ट्रान्सफॉर्मर गरम होणे, फ्यूज उडणे किंवा वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे काही भागात तात्पुरता वीजपुरवठा बंद केला जातो.

अनेक वेळा औद्योगिक क्षेत्रांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात जास्त वेळ लोडशेडिंगचा सामना करावा लागतो.

वीज यंत्रणेवर ताण कमी करण्यासाठी वीज वितरण कंपन्या काही भागांमध्ये ठराविक वेळेस वीजपुरवठा बंद ठेवतात. यालाच लोडशेडिंग म्हणतात.

काही वेळेस कोळशाचा तुटवडा, पाण्याची कमतरता किंवा तांत्रिक बिघाडांमुळे वीज निर्मिती कमी होते. त्यामुळे संपूर्ण गरज भागवणे कठीण होते. अशा वेळी वीज खंडित करणं हा पर्याय निवडला जातो.

त्यामुळे लोडशेडिंग कमी करण्यासाठी अनावश्यक वीजेचा वापर टाळा. याशिवाय सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासोबतच ऊर्जा बचत करणारी उपकरणे वापरा.