धक्कादायक! लग्नानंतर पाचव्याच दिवशी पतीला जीवंत जाळले, पत्नीने सांगितले धक्कादायक कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:27 PM2023-02-02T17:27:56+5:302023-02-02T17:52:50+5:30

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एटा येथे आठ दिवसांपूर्वी लग्न करून घरी आलेल्या पत्नीने पतीला जिवंत जाळल्याची बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एटा येथे आठ दिवसांपूर्वी लग्न करून घरी आलेल्या पत्नीने पतीला जिवंत जाळल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खून केलेल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांच्या चौकशीत पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे. पत्नीच्या संमतीशिवाय लग्न केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

कुटुंबीयांनी तिच्या इच्छेशिवाय लग्न केले होते मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निगोह हसनपूर गावातील ही घटना आहे. बुधवारी रात्री येथे दुष्यंतकुमार चौहानला जाळून मारल्यानंतर पोलिसांनी नवविवाहित संजना आणि तिच्या आरोपी प्रियकराला अटक केली.

पोलिसांच्या चौकशीत विवाहितेने सांगितले की, तिचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होते. तर कुटुंबीयांनी तिचे लग्न मध्यमवयीन मुलाशी लावले. यामुळे तिने पतीची हत्या करण्यासाठी हा भयंकर प्लॅन केला. या प्रकरणी मृत दुष्यंतच्या मामाने फिर्याद दिली आहे.

दुष्यंतच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी सौम्याने सांगितले की, खुनाच्या आधी संध्याकाळी आईने आम्हाला मेथी-बटाटा भुजियाच्या भाजीत गुंगीचे औषध पाजले होते. हा तरुण जवाहर औष्णिक प्रकल्पातील कंपनीत कार चालक म्हणून काम करत होता. रात्री नऊच्या सुमारास ते कामावरून परतले होते. यानंतर त्याला अंमली पदार्थही पाजण्यात आले. खुनाचा कट आधीच रचला गेला होता. सुनियोजित पद्धतीने पत्नीला बेशुद्ध करून जिवंत जाळले.

दुष्यंतच्या पहिल्या पत्नीची मुलगी सौम्याने सांगितले की, खुनाच्या आधी सायंकाळी आईने आम्हाला मेथी-बटाटा भुजियाच्या भाजीत गुंगीचे औषध पाजले होते. हा तरुण जवाहर औष्णिक प्रकल्पातील कंपनीत कार चालक म्हणून काम करत होता. रात्री नऊच्या सुमारास ते कामावरून परतले होते. यानंतर त्याला अंमली पदार्थही पाजण्यात आले. खुनाचा कट आधीच रचला होता.

'संध्याकाळी आईने मेथी-बटाट्याची भाजी केली होती, त्याची चव खराब होती. जेवण झाल्यावर आम्ही झोपलो. नंतर काहीच कळले नाही आणि बेशुद्ध पडलो.

दुष्यंत हा रविपाल सिंह यांचा एकुलता एक मुलगा होता. 2013 मध्ये पहिले लग्न कासगंज जिल्ह्यातील सिद्धपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सारवल गावात राहणाऱ्या मांडवीसोबत झाले होते. दोघांना चार मुले आहेत. त्यापैकी सौम्या 10 वर्षांची, छावी 7 वर्षांची, शौर्य 5 वर्षांची आणि वीर दोन वर्षांची आहे. कौटुंबिक कलहामुळे मांडवी यांनी मे 2022 मध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती.

गावातील शिवकुमार सिंह यांनी 23 जानेवारी रोजी खरसुलिया गावात राहणाऱ्या संजना हिच्याशी सासरच्या मंडळींनी लग्न केले. ती पहिल्यांदाच सासरच्या घरी आली होती. कोणाशी जास्त बोलत नव्हती. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.