एचएएलसह विविध खासगी कंपन्या व निमसरकारी विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाऱ्यांचे मागील चार वर्षांचे संशोधित व बनावट आयकर विवरणपत्र दाखल करून आयकर विभागासह करदात्यांचीही फसवणूक करणारा संशयित किशोर राजेंद्र पाटील हा अद्यापही फरार आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने राज्यात १४४ जागांची मागणी केलेली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला १२० पर्यंत जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. सेनेची मागणी व मिळणाऱ्या जागांचा विचार करता जिल्ह्यात युतीचे जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता ...
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी सेनेत प्रवेश करीत आपला मतदारसंघ निश्चित केल्यानंतर त्यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी कॉँग्रेसने धावपटू कविता राऊतची मनधरणी करीत कॉँग्रेसकडून लढण्याबाबतची गळ घातली होती. ...
पक्षीय संघटनाची अवस्था फारशी चांगली नसताना तसेच पक्षाच्या बाजूने कोणतेही वारे वाहत नसतानादेखील मनसेचे काही पदाधिकारी त्यांच्या मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी आपापल्या परीने मोर्चेबांधणी करीत होते. ...
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने २७ वर्षांपूर्वी बांधलेल्या कश्यपी धरणासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला अखेर यश आले असून, राज्य शासनाने ३६ प्रकल्पग्रस्तांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. ...
स्मार्ट सिटीच्या कारभारावर टीका करतानाच नगरसेवकांनी लक्ष केलेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महापौर रंजना भानसी यांच्यासह सत्तारूढ भाजपाने पूर्णत: संरक्षण दिले आहे. ...
शहरात पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन करण्यास यंदाही प्रतिसाद मिळाला असून, यंदा १ लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १३ हजारांनी मूर्ती संकलन वाढले आहे. ...
ढोल-ताशांचा गजर, लेजीमचा ठेका, पारंपरिक पेहरावांवर रंगीबेरंगी फेट्यांनी वाढवलेली शोभा आणि त्यात वरुणराजाने अलगदपणे सुरू केलेल्या जलाभिषेकात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपनगरांमध्येही श्रींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...
शासनाच्या महामेट्रो अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मेट्रो नियो प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेला तब्बल १०२ कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने त्याबाबत महापालिकेत नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
प्रथमोपचार हे आजच्या धकाधकीच्या जीवनात आवश्यक गोष्ट ठरत आहेत. पूर्वीपेक्षा प्रथमोपचारात काळानुरूप काही बदल झालेले आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यात सध्या अपघात हा कसा व कुठे होईल हे सांगता येत नाही. ...