कोरोनाचा सर्वत्र कहर सुरू आहे. ओझरसह परिसरात वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करून ओझर व्यापारी असोसिएशनने आठ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास ओझरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ओझरटाऊनशिपमध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत झ ...
दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी होणार असून कोरोनाच्या संकट दूर होवो यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. ...
ओझरटाऊनशिप : ओझर येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत असून शनिवारी (दि.२४) ८५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, ओझरला जनता कर्फ्यू सुरू आहे तर एचएएल कारखानाही चार दिवसापासून बंद आहे तरीही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. ...
सर्वतीर्थ टाकेद : येथील ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून टाकेद येथे लवकरच कोविड सेंटर सुरू होणार असल्याने शनिवारी (दि. २४) आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी निवासी वसतिगृहाची इमारत स्वच्छ करण्यात आली. ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि देशमाने येथे मागील काही महिन्यांपासून मुखेड महावितरण कडून सिंगल फेज वीजपुरवठा सुरू असताना, ओव्हरलोडमुळे तीनपैकी एक फेज बंद करून, ऐन रात्रीच्या वेळी दीड ते दोन तासांसाठी कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथे शनिवारी (दि.२४) जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येऊन शुभारंभ करण्यात आला. ...
पिंपळगाव लेप : सातत्याने ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत चालली असून सध्या गाव बंद असल्याने निर्जंतुकीकरण उपाययोजना म्हणून गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. ...
सटाणा : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकट काळात मदतीचे हातदेखील तेवढेच महत्त्वाचे असतात. या काळात बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन गवळी यांनी रुग्णांसाठी मोफत वाहन सेवा सुरू केली आहे. ...
सायखेडा : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आरोग्य विभागाने गावातील नागरिकांच्या विशेष पथकाची नेमणूक करून घरोघरी जाऊन आरोग्य तपासण्या कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे. ...
देसराणे : कळवण तालुक्यातील सुतार-लोहार समाजातील ८० टक्के मंडळी लाकडी, लोखंडी कामे करतात. हा समाज या निर्बंधांमुळे पूर्णतः खचला आहे. शासनाने अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा सुतार-लोहार समाजातील गरजू बांधवांना करावा व त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थि ...