Next

पाकिस्तानी विमानाला भारतीय लढाऊ विमानाने घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 10:14 AM2019-05-11T10:14:21+5:302019-05-11T10:14:55+5:30

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने  पाकिस्तानातील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे  पाकिस्तानने हवाई हद्द सील केली ...

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने  पाकिस्तानातील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे  पाकिस्तानने हवाई हद्द सील केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान भारतीय हद्दीत आल्याने हवाई दल सतर्क झाले आहे. सुखोई लढाऊ विमानांनी या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले आहे. हे विमान जॉर्जियाचे असून कराचीहून या विमानाने उड्डाण केले होते