कार उलटल्याने तालुक्यातील जैतापूर येथील सामजिक कार्यकर्ते, पत्रकार सचिन नरेंद्र नारकर (५0) यांचा अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाने रात्री झालेल्या अपघाताची माहिती सकाळी सर्वांना समजली आणि त्यानंतर त्यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढण्यात आले. ...
कोकणातील ग्रामीण भागात कमी लोकसंख्येमुळे आरोग्य उपकेंद्राच्या स्थापनेसाठी अडचणी येत असल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नियमामुळे अडचणी असल्याचे स्पष्ट केले. ...
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील हिरापन्ना बेकरीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोण पसरले आहे. १ तासाने ही आग आटोक्यात आली. ...
दिल्लीतील दंगल बंदोबस्ताचा ताण आल्याने मंडणगड तालुक्यातील लाटवण येथील मुकेश नारायण कदम या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या जवानाचे पार्थीव मंगळवारी लाटवणला आणले असून, लाटवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे. ...
जिल्हा परिषदेचे दोन्ही शिक्षण विभाग आणि पाणी व स्वच्छता विभाग यांनी जिल्ह्यातील १३ हजार विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील ९६९ प्राथमिक शाळांमध्ये १ ...
गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक् ...