शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. ...
कर्जत तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात चाफेवाडी, डोंगरपाडा, पिंगळस, भालीवडी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत. तालुक्यातील विविध भागांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. येथे अनेक अडचणी असून, आश्रमशाळेत अनेक पदेही रिक्त आहेत. ...
अष्टमी मोहल्ला विभागातील नागरिकांना भरपावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असल्याने स्थानिक महिलांनी सोमवारी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांची भेट घेतली व आपले गा-हाणे मांडले. ...
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाल्याचे सत्यही या अपघातामुळे समोर आले आहे. ...
शहरात गोहत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याविरोधात अलिबागमधील नागरिक एकत्र आले असून त्यांनी शहरातील तब्बल ४३ मोकाट गुरांना पकडून नगर पालिकेच्या ताब्यात दिले. ...
६० वर्षांनी २०१८च्या रेमन मॅगसेसे पुरस्कारासाठी मनोरुग्ण उपचार आणि पुनर्वसनाचे काम करणारे सेवाव्रती डॉ. भरत वाटवानी यांची झालेली निवड देश आणि रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे. ...