राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आले. हरियाणात पवारांच्या राष्ट्रवादीने तुतारी चिन्हावर एकाला उमेदवारी दिली. ...
शरद पवार गाडीजवळ उभे असल्याचे पाहून सुप्रिया सुळे चकीत झाल्या. ‘झाले ना, चला आता...’ एवढेच शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना म्हणाले व त्यानंतर दोघेही कारमध्ये बसून निघून गेले. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? कुठून लढवणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पूर्णविराम दिला. ...