Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
आमदार, खासदार वेगळ्या गटात जाऊन पक्ष प्रमुखांनाच आव्हान देऊ पाहत आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. ...
खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेल्याने ते कालपासून नॉट रिचेबल होते. बुधवारी आसाममधील गुवाहाटी येथे गेल्यानंतर ते रिचेबल झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...